यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे ९९

- १९६० फेब्रुवारी १३, (सावरगाव-डुकरे) येथे भरलेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे उद्घाटक.

- १९६० मे, महाराष्ट्र राज्याची उत्साही वातावरणात स्थापना व नवीन राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथविधी.

- १९६० ऑक्टोबर २१, पुणे येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे जाहीर सत्कार

- १९६० नोव्हेंबर, अखिल भारतीय काँग्रेस निवडणूक मंडळावर निवड.

- १९६० नोव्हेंबर १०, नागपूर कराराच्या अंमलबजावणीचा महत्त्वाचा भाग म्हणून नागपूरात महाराष्ट्र विधिमंडळाचे एक अधिवेशन दरवर्षी भरविण्यास सुरुवात.

- १९६० डिसेंबर जून, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना व नागपूर येथे मंडळाचे उद्घाटन.

- १९६०, मुंबई येथे शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण.

- १९६१ जानेवारी, काँग्रेस महासमितीमधून निवडणूक पद्धतीने प्रथमच झालेल्या निवडीत वर्किंग कमिटीवर निवड.

- १९६१ मार्च मध्ये विदर्भातील जनतेच्या वतीने नागपूर येथे ४७ व्या वाढदिवासानिमित्त सत्कार समारंभ.

- १९६१, दिल्ली येथे भरलेल्या ४३ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे (स्वागताध्यक्ष).

- १९६२ मे १, पंचायत राज्य योजनेचा प्रारंभ.

- १९६२ ऑक्टोबर, 'केसरी' च्या दिवाळी अंकात 'नियतीचा हात' हा पहिला लेख प्रसिद्ध.

- १९६२ नोव्हेंबर २३, भारताचे संरक्षणमंत्री म्हणून सूत्रे स्वीकारली.

- १९६३, अमेरिकेचे संरक्षण खात्याचे सचिव मॅक्नामारा यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेस भेट.

- १९६३ ऑगस्ट, रशियाचा दौरा, रशियन पंतप्रधान क्रुश्चेव्ह यांच्याशी चर्चा,मदतीचे आश्वासन.

- १९६४ ऑगस्ट २८, रशियाचा दौरा.

- १९६५, दिल्लीतील महाराष्ट्रीय शिक्षणसंस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती

- १९६५ जानेवारी, नांदेड येथे भरलेल्या ४७ व्या अखिल मराठी नाट्य परिषद-अधिवेशनाचे उद्घाटक

- १९६६ जानेवारी, ताश्कंद येथे शास्त्रीजी - अयुबखान यांची चर्चा ( कोसिजिन यांच्या प्रयत्नानुसार यशवंतराव उपस्थित )