समग्र साहित्य सूची १४५

१९६० -  ऑक्टोबर २१, पुणे येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे जाहीर सत्कार,

१९६० -  नोव्हेंबर, अखिल भारतीय काँग्रेस निवडणूक मंडळावर निवड.

१९६० -  नोव्हेंबर १०, नागपूर करार अंमलबजावणीचा भाग म्हणून महाराष्ट्र विधिमंडळाचे एक अधिवेशन नागपूरात दरवर्षी भरविण्यात सुरुवात.

१९६० -  डिसेंबर २१, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना व नागपूर येथे मंडळाचे उद्‍घाटन.

१९६० -  डिसेंबर, मुंबई येथे शिवछत्रपतींच्या पुतळयाचे अनावरण.

१९६१ -  जानेवारी, काँग्रेस महासमितीमधून निवडणूक पद्धतीने प्रथमच झालेल्या निवडीत वर्किंग कमिटीवर निवड.

१९६१ -  दिल्ली येथे भरलेल्या ४३ व्या अ.भा.मराठी नाटय संमेलनाचे स्वागताध्यक्ष.

१९६१ -  मार्च ३०, विदर्भातील जनतेच्या वतीने नागपूर येथे ४७ व्या वाढविदसानिमित्त सत्कार समारंभ.

१९६२  -  मे १, पंचायत राज्य योजनेचा प्रारंभ.

१९६२  - सातारा येथे भरलेल्या अ.भा.म. साहित्य संमेलनाचे उद्‍घाटक.

१९६२  - फेब्रुवारी, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका, काँग्रेसने २६५ पैकी २१४ जागा जिंकून प्रचंड विजय मिळविला.

१९६२ -  ऑक्टोबर, 'केसरी' च्या दिवाळी अंकात 'नियतीचा हात' हा पहिला लेख प्रसिद्ध.

१९६२ - नोव्हेंबर २२, भारताचे संरक्षणमंत्री म्हणून सूत्रग्रहण.

१९६३ - नाशिक जिल्ह्यामधून लोकसभेवर बिनविरोध निवड.